मागे वळून बघतांना ,
जीवनाचे रहस्य उलगडत जाते ,भूतकाळातील आठवणींना पाया माना .
सत्य ते हे की ,वर्तमानात जगायचे असते . १
काळाच्या ओघात बरेच काही वाहून गेले ,
संधी आली पण गमावली ,असे सारखे वाटत असते ,
हूर हूर मनात दाटून येते ,भविष्याची काळजी मात्र वाढतच जाते . २
भूत -भविष्याचे ओझे वर्तमानच वाहत असतो .
वर्तमानातच भविष्याचे उज्जल स्वप्न दडलेले असते ,
वर्तमानालाच आपले माना ,
आला क्षण सुखात घालवा . ३
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : अनघा कुलकर्णी